Ticker

6/recent/ticker-posts

Ad Code

Responsive Advertisement

श्री विठ्ठल कारखान्यावर कर्मवीर औदुंबरआण्णांची १००वी जयंती साजरी

 

पंढरपूर - टिम कृषीदीप न्यूज

 पंढरपूर तालुक्यातील वेणुनगर-गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे संस्थापक चेअरमन व माजी आमदार कर्मवीर कै. औदुंबररावजी (आण्णा) पाटील यांची १०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या प्रसंगी कारखाना कार्यस्थळावरील कर्मवीर कै. औदुंबररावजी (आण्णा) पाटील यांचे पुर्णाकृती पुतळ्याची विधीपूर्वक पुजा कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज पंढरपूरचे माजी प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव डॉ.जे.जी. जाधवसर, कारखान्याचे जेष्ठ सभासद श्री मधुकर नाईकनवरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री बाळासाहेब पाटील, श्री विठ्ठल हॉस्पीटलचे सचिव श्री अभिजीत राजाराम पाटील यांचे शुभहस्ते व कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीत आबा पाटील, श्री रणजित राजाराम पाटील, अमरजित राजाराम पाटील व सर्व संचालक मंडळ यांचे प्रमुख उपस्थितीत सपन्न झाला.

याप्रसंगी आमदार रोहितदादा पवार यांचे वडील श्री राजेंद्र पवार यांनीही आवर्जून उपस्थित राहून कै. औदुंबर (आण्णा) पाटील यांना आदरांजली वाहिली...

 यावेळी कारखान्याचे चेअरमन श्री अभिजीतआबा पाटील म्हणाले की, कै. औदुंबरआण्णा पाटील व्यापारी दृष्टीकोण घेवून पंढरपूर तालुक्यात आले व त्यांना सर्वांच्या सहकाऱ्यांनीच विधानसभेत जाणेची संधी मिळाली व कै. यशवंतरावजी चव्हाण व श्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे विचारातून कमी खर्चात श्री विठ्ठल कारखान्याची निर्मिती करुन पंढरपूर तालुक्यात कृषी व औद्योगिक क्रांती करुन दाखविली. कै. औदुंबर आण्णांनी अतिशय काटकसर करुन स्वभांडवलातून कारखान्याचे विस्तारीकरण करुन सातत्याने सोलापूर जिल्ह्यात एक नंबरचा व महाराष्ट्रात सहा नंबरचा दर देवून कारखान्यास वैभव प्राप्त करुन दिले. त्यांनी कै. आण्णांच्या जुन्या आठवणींना उजाळा देवून म्हणाले की, आम्हीही कै. औदुंबरआण्णांच्या पावलावर पाऊल ठेवून कारखान्याचा कारभार करुन यापुढे सर्वात जास्त दर देणार असल्याचे त्यांनी सांगितले...

चालू हंगामामध्ये श्री विठ्ठल कारखान्याचे २२ दिवसात १,७५,६१५ मे.टन गाळप झाले असून या गळीत हंगामामध्ये १० लाख मे.टनाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट ठेवले असून सर्व सभासद शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण पिकविलेला ऊस श्री विठ्ठल कारखान्यास देवून सहकार्य करणेचे आवाहन केले, आपले कारखान्याकडे नोंदलेल्या सर्व ऊसाचे आम्ही गाळप करणार आहे, तसेच सभासद शेतकऱ्यांनी यावर्षी तुटलेला खोडवा ऊस ठेवून त्याची निडवा ऊस म्हणून कारखान्याकडे नोंद करुन पुढील २०२४-२५ गळीत हंगामामध्ये गळीतास दिल्यास या निडव्या ऊसास रुपये १००/- प्र.मे.टन जादा दर देणार असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

कर्मवीर कै. औदुंबररावजी (आण्णा) पाटील यांचे १०० व्या जयंतीनिमित्त कारखान्यामध्ये उत्पादानाशी निगडीत अखंड प्रामाणिकपणे उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या सेवकांचा प्रातिनिधीक स्वरुपात गुणगौरव सन्मान चिन्ह व मानधन देवून उपस्थितांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला व यापुढेही कै. आण्णांच्या जयंतीच्या वेळी सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचा गुणवंत कामगार म्हणून गौरव करणेत येईल, असे श्री विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत आबा पाटील यांनी सांगीतले.

स्वागत व प्रस्ताविक कारखान्याचे संचालक प्रा. तुकाराम मस्केसर यांनी केले तर कारखान्याचे संचालक श्री दिनकरदाजी चव्हाण यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले व सुत्रसंचलन श्री चव्हाणसर यांनी केले.


Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement