भंडीशेगांव - ( टिम कृषीदीप न्यूज )
भंडीशेगांव ता.पंढरपूर येथील पोलीस कॉन्स्टेबल वामन येलमार यांच्या आईचे अल्पशा आजाराने निधन झाले. अंत्यसंस्कार झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी परंपरेनुसार मृताच्या अस्थी व राख नदी पत्रात सोडण्याची परंपरा आहे, परंतु वामन येलमार व त्यांच्या कुटुंबातील सर्वच जणांनी सदर अस्थी आणि राख नदी पत्रात न सोडता नदीचे प्रदूषण टाळून घरासमोर खड्डे घेऊन त्यात राख टाकून त्यावरती वृक्षारोपण करून समाजात एक आदर्श घालून दिला.
मुबई येथील उद्योजक व वृक्षमित्र अजित कंडरे यांनी भंडीशेगांव येथे मागील काही वर्षांपासून वृक्षारोपण ची चळवळ सुरू केली आहे. यामध्ये प्रामुख्याने वाढदिवसाच्या निमित्ताने तसेच वेगवेगळ्या विविध कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपण नी करण्याचा गावात एक पायंडाच पडला आहे. यावेळी मात्र पोलीस कॉन्स्टेबल वामन येलमार यांच्या आईचे निधन झाल्यानंतर त्यांच्या अस्थी नदीपात्रात सोडण्या ऐवजी त्या अस्थी व राख शेतात खड्डयात टाकून त्यांवर एक झाड लावून त्या झाडाचे निगा राखून आपल्या आईचे स्मरण राहावे व त्यांची आठवण राहावी अशी कल्पना बाबासाहेब येलमार गुरुजी यांनी व्यक्त केली,त्या नुसार सर्वांनी या निर्णयाला सहमती देऊन यापुढेही सर्वांनी असेच वृक्षारोपण करण्याचे मान्य केले.
वामन येलमार हे पंढरपूर येथील श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्यरत असून स्वतः ते माळकरी विठ्ठल भक्त आहेत,अत्यंत धार्मिक आसा त्यांचा स्वभाव आहे,पंढरपूर येथील प्रत्येक वारी मध्ये त्यांनी महाराष्ट्र मधून पंढरपूर ला बंदोबस्त साठी आलेल्या हजारो पोलीस बांधवांची मोफत भोजन व्यवस्था केली होती,त्याचप्रमाणे त्यांनी सह्याद्री हॉस्पिटल चे लिव्हर प्रत्यारोपण तज्ञ डॉ.बिपीन विभूते यांच्या वाढदिवसानिमित्त देखील वृक्षारोपण केले होते.
यावेळी बाबासाहेब येलमार,संतोष भोसले,भाजपा वैद्यकीय सेल चे अध्यक्ष डॉ.श्रीधर येलमार,मारुती गिड्डे,महादेव येलमार,भैरवनाथ यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष संतोष येलमार,बलभीम तोडले,हनुमंत येलमार आदी उपस्थित होते.

0 Comments